Vaibhav Lakshmi Vrat Katha | वैभव लक्ष्मी व्रत कथा,पूजेचे महात्म्य,पूजा विधी संपूर्ण माहिती मराठीत

नमस्कार , आज आपण या लेखांमध्ये वैभव लक्ष्मी व्रत विषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. vaibhav lakshmi vrat katha in Marathi वैभव लक्ष्मी vaibhav lakshmi व्रत हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध व्रत आहे. ज्यांना ऐश्वर्य, सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप फायदेशीर आहे. वैभव लक्ष्मी विधी कसा करतात? vaibhav lakshmi vrat vidhi हे  व्रत शुक्रवारी केले जाते. हे व्रत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्याचे सर्वात सोपे मार्ग आहे. 

Table of Contents

Vaibhav Lakshmi Vrat Katha | वैभव लक्ष्मी व्रत कसे सुरू करावे?

संकल्प घ्या : व्रत सुरू करण्यापूर्वी तुम्ही ते भक्ती आणि श्रद्धेने कराल असा दृढ संकल्प मनात करा. वैभव लक्ष्मी व्रत  शुक्रवारी  केला जातो. तुम्ही हे सलग 11, 21 किंवा 51 शुक्रवारी करू शकता. उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पांढरे किंवा लाल कपडे घाला.

साहित्य:  दिवा, धूप, फुले, तांदूळ, पांढरे कापड आणि लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती लागेल.


Vaibhav Lakshmi Vrat Katha
Vaibhav Lakshmi Vrat Katha

वैभव लक्ष्मी व्रताची पद्धत

पूजेचे ठिकाण स्वच्छ करा. लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. त्यांच्यासमोर पांढरे किंवा लाल कापड अंतरा दिव्यात तूप किंवा तेल घालून दिवा लावा. पूजा संपेपर्यंत हा दिवा जाळला पाहिजे. अगरबत्ती  लावा. त्यातून वातावरण शुद्ध होते.


मंत्रांचा जप करा:

श्रीमहालक्ष्म्यै नमः ।

लक्ष्मीरूपये नमः ।

देवी लक्ष्मीला लाडू किंवा खीरसारखा गोड प्रसाद अर्पण करा.

Vaibhav Lakshmi Vrat Katha : Vaibhav Lakshmi Vrat Katha वाचा आणि ती ऐका. ही उपवासाची सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

 शेवटी देवी लक्ष्मीची आरती करा आणि 

वैभव लक्ष्मी व्रत कथा

एक आटपाट नगर होते. तेथील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण थोड्याच दिवसात काही काळाने बदल झाला. त्या ठिकाणचे लोक वाईट मार्गाला लागले चोरी करू लागले. दरोडो जुगार अशा व्यसनांच्या आहारी गेले. त्याच गावात काही चांगले माणसे देखील होती. त्य गावात शीला व तिचे पती राहत होते. दोघेही धार्मिक व शांत होते.

शीला चा संसार सुखाने चालला होता. पण थोड्याच दिवसात तिच्यावर वाईट दिवस आले. मित्राची संगत लागली पती वाईट मार्गाला गेले. मित्रांनी त्यांना फसवले म्हणले आपण लगेच कोट्याधीश होऊ पण खोट्याधीश न होता रस्त्यावर भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. शीला ही एक संस्कृत सुशील तिला आपल्या नवऱ्याच्या वागण्याचे खूप वाईट वाटत होते. पण तिचा देवावर विश्वास होता तिला माहित होते की दुःखानंतर सुख हे येतेच. ईश्वरावर तिची खूप श्रद्धा आणि विश्वास होता.

एक दिवस दुपारी शीला घरी विचार करत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आली आपल्या घरी कोण आले म्हणून शीलालग-भगिनी बाहेर गेली. आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला आपण चहापाणी करतो. च्या घरी आलेले एक वृद्ध स्त्री होती. त्यांना पाणी दिले. शीलानी त्या वृद्ध स्त्रीला पाणी दिले व घरात बसण्यासाठी पाठ टाकला. त्याबद्दल स्त्रीने शिलाला विचारले शीला तू मला ओळखलस का त्या म्हणाली मी तुम्हाला ओळखलं नाही पण मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. गेल्या काही दिवसापासून असलेल्या साऱ्या चिंतेतून मुक्त झाल्यासारखे मला वाटत आहे. तुम्ही आलात बरं वाटलं.

ती माता हसली आणि म्हणाली तू मला विसरलीस की काय आपण लक्ष्मी मातेच्या मंदिरात जर शुक्रवारी भजनाला भेटत होतो आठवत नाही का तुला ? नवऱ्याच्या अशा वागण्याने शीला खूप खचून गेली होती. बाहेरच्या लोकांना काय तोंड दाखवायचे तिला लाज वाटायची म्हणून मंदिरात जाणे बंद केले.

त्या मातेने शिलाला सांगितले पण तिला काही आठवत नव्हते. ती माता म्हणलीस की तू भजन खूप छान म्हणत होतीस. पण अलीकडे तू मला दिसलीस नाही मला वाटलं की तू आजारी आहेस की काय म्हणून मी तुला शोधत शोधत आज तुझ्या घरी आले. ती माता शीलाच्या जवळ गेली व पाठीवरून हात फिरवत म्हणाली बाळा सुख व दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेले असते. तुझे दुःख मला सांग मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल मी तुला एखादा उपाय सांगेल.

शीलाला मातेच्या बोलण्याने धीर आला. ती म्हणाली पूर्वी माझ्या संसारात आनंद सुख भरपूर होते. माझे पती चांगले होते. पण मित्राच्या नादाने ते वाईट मार्गाला गेले. त्यांना आमचे नशीब बदलले . माझे पती व्यसनाधीन झाले आम्ही भिकारी झालो. त्यावर ती माता म्हणाली प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. लक्ष्मी मातेचे व्रत कर लक्ष्मी माता प्रेम दया करुणा कृपा यांचा अवतार आहे. भक्ताचे निवारण करते तिच्या व्रत केले तर चांगलेच होईल . मातेचे हे बोलणे ऐकून शीला त्या मातीला म्हणाली हे व्रत मला सांगा मी मनापासून करेल. या व्रतला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असे म्हणतात. मनापासून हे व्रत करणाऱ्याचे सर्व इच्छा पूर्ण होतात. त्या मातेने संपूर्ण व्रताचा वसा शिलाला सांगितला.

हे व्रत शुक्रवार करावे .व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे घालावी. देवपूजा करावी. व त्यानंतर त्यादिवशी कोणाचे निंदा करू नये मनामध्ये वैभव लक्ष्मीचा जप करावा. खोटे बोलू नये . सायंकाळी दिवाबत्ती करावी देवापुढे नंदादीप लावावा हात पाय स्वच्छ धुऊन पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. वैभवलक्ष्मी मांडणी करावी. पाच झाडाची पाने घ्यावीत. कलश मांडावा. चौरंगावर लाल कपडा टाकावा. त्यावर गव्हाची रास घालावी .त्यावर कलश मांडावा. पान सुपारी चा विडा ठेवावा. वैभव लक्ष्मीचा फोटो असल्यास फोटो ठेवावा. देवीला गोडाचा नैवेद्य खीर किंवा शिरा करावा.

21, 11 शुक्रवारचे व्रत करावे व व्रतच्या शेवटी उद्यापन करावे. संपूर्ण माहिती मातेने शिलाला सांगितली व शील आणि ती मनोभावे केले. व तिचे पूर्वीचे गेलेले दिवस तिला मिळाले. जो कोण मनोभावे व्रत करेल त्याला माता लक्ष्मी प्रसन्न होईल. पण या व्रतने चांगले दिवस आल्यावर हे व्रत सोडून नये. नीतीनेमाने हे व्रत करावे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहिल.

वैभव लक्ष्मी व्रताचे नियम

व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळा. मांस, मद्य आणि मादक पदार्थांपासून दूर रहा.

दिवसभर फळे खा आणि मन शांत ठेवा. पूजेनंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद  द्यावा.


Vaibhav Lakshmi Vrat Katha
Vaibhav Lakshmi Vrat Katha

Vaibhav Lakshmi Vrat Katha – वैभव लक्ष्मी व्रताचा लाभ

हे व्रत धनाशी संबंधित समस्या दूर करते. घरात सुख आणि शांती आणण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.  लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या व्रतामुळे कर्ज आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. व्रताच्या वेळी तुमच्या स्वप्नात लक्ष्मी येईल तर ते खूप शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी दिव्याचा प्रकाश स्थिर आणि तेजस्वी असेल तर ते देवीच्या कृपेचे लक्षण आहे.

पूजेनंतर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Samarth Ramdas Information in Marathi|समर्थ रामदास स्वामी मराठीत माहिती

उपवासात काही  पदार्थ खावेत का?

उपवासाच्या दिवशी फळे, दूध आणि हलका आहार घ्या. मांसाहार टाळा. प्रत्येकजण हे व्रत करू शकते.

 स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्रत पूर्ण करत असताना काही चुका झाल्या असता देवीची क्षमा मागावी.

शेवटच्या शुक्रवारी 11 मुलींना अन्नदान करा आणि त्यांना भेटवस्तू Vaibhav Lakshmi Vrat Katha चे पुस्तक द्या. पुरणपोळीचा नैवेद्य करा व सर्व मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुस्तक भेट द्या. व त्यांच्या पाया पडा. वैभव लक्ष्मी व्रत हा एक अद्भुत उपाय आहे जो केवळ संपत्ती मिळवण्यातच मदत करत नाही तर जीवन आनंदी आणि शांत बनवतो. या व्रताचे नियमित पालन केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. भक्ती आणि श्रद्धेने करा आणि लाभ घ्या.

वैभवलक्ष्मी मातेची कथा Vaibhav Lakshmi Vrat Katha फार पूर्वीची आहे, जिथे भक्ती, श्रद्धा, आणि देवत्वाचे खूप महत्त्व आहे. एका नगरात, जिथे माणसे परस्परांत प्रेमभावाने वागत होती, तेथे कालांतराने दुराचाराचा प्रसार झाला. जुगार, दारू, व्यभिचार, चोरी यांसारख्या वाईट प्रवृत्ती वाढल्या. अशा वातावरणातही काही धार्मिक, संस्कारी माणसे राहात होती.

करुणा आणि तिचा पती या नगरीतील आदर्श जोडपे होते. करुणा धार्मिक, श्रद्धाळू आणि संतुष्ट होती, तर तिचा पती सुशील आणि विचारी होता. दोघांचा संसार आनंदात चालला होता. मात्र, म्हणतात ना, कर्मगती काही निराळी असते,तसेच घडले. करुणाच्या पतीला वाईट संगत लागली आणि दारू, जुगार, रेस यांसारख्या व्यसनांमुळे त्याने संपूर्ण संपत्ती गमावली. घरात उपासमारीची वेळ आली. करुणाला दु:ख सहन होत नव्हते, पण तिचा परमेश्वरावर विश्वास होता. ती भक्तीमध्ये रमली आणि एक दिवस लक्ष्मी मातेचे रूप घेतलेल्या म्हातारीने तिच्या दारावर प्रवेश केला.


Vaibhav Lakshmi Vrat Katha
Vaibhav Lakshmi Vrat Katha

लक्ष्मी मातेचे व्रत

म्हातारीने करुणाला वैभवलक्ष्मी व्रताचे महत्त्व सांगितले. हे व्रत विधिपूर्वक केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि धन, सुख, संपत्ती प्राप्त होते. हे व्रत करण्याची पद्धतही तिने शिकवली.

 प्रत्येक शुक्रवारी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. चौरंगावर लाल कापड पसरून त्यावर श्री लक्ष्मी यंत्र ठेवावे. एक तांब्याचा लोटा, तांदळाची राशी आणि सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा. मातेचे ध्यान करावे, मंत्रोच्चार आणि आरती करून नैवेद्य दाखवावा.

व्रत पूर्ण झाल्यानंतर सात सुवासिनींना Vaibhav Lakshmi Vrat Katha व्रताची पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यावा.

करुणाच्या जीवनात बदल

करुणाने पूर्ण श्रद्धेने वैभवलक्ष्मी व्रत केले. 21 शुक्रवारी व्रत पूर्ण केल्यावर तिच्या जीवनात मोठा बदल घडला. तिचा पती वाईट संगतीपासून दूर झाला आणि पुन्हा मेहनतीने काम करू लागला. लवकरच त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारली.  आणि त्यांच्या घरात सुख, शांती आणि वैभव परतले.

वैभवलक्ष्मी व्रत हे केवळ धनसंपत्ती मिळवण्यासाठीच नव्हे, तर भक्ती, श्रद्धा, आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. व्रत करणाऱ्या स्त्रीसाठी अखंड सौभाग्य मिळते. कुटुंबात सुख-शांती नांदते.

मानसिक शांती आणि समाधानाची अनुभूती होते.

वैभवलक्ष्मी मातेचे व्रत हे केवळ विधी नव्हे, तर भक्ती, श्रद्धा, आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाला नवचैतन्य देणारे आहे. प्रत्येक भक्ताने या व्रताच्या मागील भक्तीभावना आणि साधनेचा आदर करावा. माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांना सुख, शांती, आणि संपत्ती प्राप्त होवो.

वैभव लक्ष्मी विकिपीडिया माहिती – वैभव लक्ष्मी


वैभव लक्ष्मी व्रताविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. वैभव लक्ष्मी व्रत काय आहे?

वैभव लक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी केले जाणारे पवित्र व्रत आहे. हे व्रत केल्याने सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

2. हे व्रत कोणत्या दिवशी करावे?

हे व्रत दर शुक्रवारी करावे. सलग 11, 21 किंवा 51 शुक्रवार पाळल्यास उत्तम फल प्राप्त होते.

3. वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात कशी करावी?

व्रत सुरू करण्यापूर्वी भक्ती आणि श्रद्धेने संकल्प घ्या. शुक्रवारी सकाळी स्नान करून पांढरे किंवा लाल वस्त्र धारण करा आणि पूजेची तयारी करा.

4. व्रतासाठी कोणती सामग्री आवश्यक आहे?

  • देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती
  • पांढरे किंवा लाल वस्त्र
  • दिवा, तूप किंवा तेल
  • फुले, अगरबत्ती, तांदूळ
  • नैवेद्य (लाडू, खीर किंवा पुरणपोळी)

5. पूजेची प्रक्रिया काय आहे?

  1. पूजेचे ठिकाण स्वच्छ करा आणि देवी लक्ष्मीचा फोटो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा.
  2. समोर पांढरे किंवा लाल कापड अंथरा.
  3. दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावा.
  4. “श्रीमहालक्ष्म्यै नमः” या मंत्राचा जप करा.
  5. देवीला गोड नैवेद्य अर्पण करा.
  6. वैभव लक्ष्मी व्रत कथा वाचा व ऐका.
  7. लक्ष्मी देवीची आरती करून व्रत समाप्त करा.

6. वैभव लक्ष्मी व्रताची कथा Vaibhav Lakshmi Vrat Katha काय आहे?

ही कथा एका गरीब महिलेच्या जीवनावर आधारित आहे. तिने श्रद्धेने वैभव लक्ष्मी व्रत केले, त्यामुळे तिचे जीवन समृद्ध झाले. तिच्या घरात सुखशांती नांदली आणि आर्थिक समस्या दूर झाल्या.

7. व्रत करताना कोणते नियम पाळावेत?

  • ब्रह्मचर्याचे पालन करा.
  • मांसाहार, मद्य आणि तामसिक आहार टाळा.
  • पूजेच्या वेळी घरात शांतता ठेवा.
  • व्रताच्या शेवटी गरजू लोकांना किंवा 11 मुलींना अन्नदान करा.

8. हे व्रत कोण करू शकतो?

स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. विवाहित स्त्रियांसाठी हे विशेष लाभदायी मानले जाते.

9. व्रताच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ शकतो?

फळे, दूध, सुकामेवा आणि हलका शाकाहारी आहार घेऊ शकता.

10. वैभव लक्ष्मी व्रत केल्याने कोणते फायदे होतात?

  • आर्थिक स्थैर्य आणि कर्जमुक्ती मिळते.
  • घरात सुख-शांती व सकारात्मक ऊर्जा वाढते.
  • देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
  • आरोग्य आणि समृद्धी वाढते.

11. व्रत करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

  • व्रताच्या दिवशी क्रोध, असत्य बोलणे आणि अहंकार टाळा.
  • पूजेच्या वेळी मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या.
  • अर्धवट व्रत सोडू नका, संकल्प पूर्ण करा.

12. व्रताच्या शेवटी कोणता विशेष विधी करावा?

अंतिम शुक्रवारी 11 मुलींना भोजन द्यावे आणि त्यांना वैभव लक्ष्मी व्रताचे पुस्तक भेट द्यावे.

13. लक्ष्मी माता प्रसन्न झाल्याची चिन्हे कोणती?

  • स्वप्नात लक्ष्मी माता दिसणे शुभ मानले जाते.
  • पूजेदरम्यान दिव्याचा प्रकाश स्थिर राहिल्यास तो देवीच्या कृपेचा संकेत आहे.
  • घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

14. व्रत करताना काही चुका झाल्यास काय करावे?

देवीची क्षमा मागावी आणि पूर्ण भक्तीभावाने व्रत चालू ठेवावे. श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे.

15. वैभव लक्ष्मी व्रताचे अंतिम उद्दीष्ट काय आहे?

हे व्रत केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक शांतीसाठी आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवन समृद्ध होते आणि संकटे दूर होतात.

धन्यवाद!


येथून शेअर करा

Leave a Comment